आयोगानं ठरवलेल्या वेळेतच निवडणुका होणार !
हायकोर्टानं सर्व २८ याचिका फेटाळल्या
मुंबई : खरा पंचनामा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरू झाली आहे. या प्रकरणी तब्बल २८ याचिका दाखल झाल्या असून, न्यायालय त्या एकत्रितपणे ऐकत आहे.
न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, 'मतदार याद्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार बनवल्या आहेत'. मराठवाडा आणि विदर्भातील पूरस्थितीचे कारण याचिकेत देण्यात आले होते, पण कोर्टाने ते अमान्य केले. मतदार यादीच्या मसुद्यावरील आक्षेप घेणारी एक याचिकाही कोर्टाने फेटाळून लावली आहे. काही याचिकांमध्ये मतदार यादीत दुबार नावे असणे आणि १८ वर्षे पूर्ण होऊनही अनेकांची नावे मतदार यादीत नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे, ज्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.