Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'कौन बनेगा करोडपती' मध्ये ५० लाख जिंकणाऱ्या तहसीलदाराला अटक

'कौन बनेगा करोडपती' मध्ये ५० लाख जिंकणाऱ्या तहसीलदाराला अटक

ग्वाल्हेर : खरा पंचनामा 

अमिताभ बच्चन यांचा 'कौन बनेगा करोडपती' (KBC) या लोकप्रिय रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होऊन राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळवणाऱ्या एका महिला तहसीलदाराला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे गुरुवारी अटक करण्यात आली. त्यांच्यावर २.५ कोटी रुपयांच्या पूर मदत निधीतील कथित 'घोटाळ्यात' सहभाग असल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२१ मध्ये बडोदा तहसीलमध्ये घडलेल्या या 'घोटाळ्या'च्या संदर्भात अमृता सिंह तोमर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी पुढे सांगितले की, न्यायालयात हजर केल्यानंतर तोमर यांना शिवपुरी येथील कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

अमृता सिंह तोमर ही 'कौन बनेगा करोडपती' या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यांनी स्पर्धक म्हणून ५० लाख रुपयांची रक्कम जिंकली होती. मात्र आता त्यांच्या अटकेची बातमी समोर आल्याने लोकांना मोठा धक्का बसला असून, लोक सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

'कौन बनेगा करोडपती' (KBC) हा भारतातील सर्वात लोकप्रिय प्रश्नमंजूषा कार्यक्रम आहे, ज्याचे सूत्रसंचालन बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन करतात. या कार्यक्रमात स्पर्धक 'हॉट सीट'वर बसतात, १५ प्रश्नांची उत्तरे देतात आणि करोडो रुपये जिंकण्याची संधी मिळवतात. या कार्यक्रमाचा १८ वा सीझन लवकरच सुरू होणार आहे.

अमृता सिंह तोमर मध्य प्रदेशातील महिला तहसीलदार असून KBC मध्ये सहभागी झाल्या होत्या. पूर मदत निधीतील २.५ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात सहभाग असल्याच्या आरोपावरून अटक झाली. ग्वाल्हेर येथे अटक करण्यात आली. हा प्रकार २०२१ मध्ये बडोदा तहसीलमध्ये घडल्याचे सांगितले जाते. त्यांनी कौन बनेगा करोड़पति मध्ये ५० लाख रुपये जिंकले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.