Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

गणेश चतुर्थीला पावसाचे पुनरागमन होणार! विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात इशारा जारी

गणेश चतुर्थीला पावसाचे पुनरागमन होणार! 
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात इशारा जारी

मुंबई : खरा पंचनामा 

सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या चार आठवड्यांच्या अंदाजानुसार, विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वेगवेगळ्या वेळी चांगला पाऊस पडू शकतो.

मिळालेल्या माहितीनुसार भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील चार आठवड्यांचा हवामान अंदाज जाहीर केला असून, त्यानुसार राज्याच्या विविध भागांमध्ये पावसात हळूहळू वाढ होण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पूर्व विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर, तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यात आज मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे.

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विदर्भात पावसाचा जोर वाढणार १० ते १७ सप्टेंबर दरम्यान विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या काळात विदर्भातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. यानंतर, पावसाची प्रणाली हळूहळू मराठवाड्याकडे सरकण्याची शक्यता आहे.

१२ आणि १३ सप्टेंबर रोजी मुंबईत चांगल्या पावसाची शक्यता सप्टेंबरच्या मध्यामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरासाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईत १२ आणि १३ सप्टेंबरच्या आसपास चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. ओडिशावर आणखी एक कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे गणेशोत्सवादरम्यान महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

१७ ते २४ सप्टेंबर दरम्यान मराठवाड्यात पावसाचे पुनरागमन हवामान विभागाच्या अंदाजानुसार, १७ ते २४ सप्टेंबर दरम्यान मराठवाडा आणि आसपासच्या परिसरात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. या काळात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.