आता फक्त दंड नाही, लायसन्स आणि RC दोन्ही धोक्यात ! केंद्राचा नवा नियम येतोय
नवी दिल्ली : खरा पंचनामा
सतत ट्रॅफिकचे नियम मोडणाऱ्या ड्रायव्हर्सवर कडक कारवाई करण्यासाठी केंद्र सरकार 'निगेटिव्ह पॉइंट्स सिस्टीम' आणण्याचा विचार करत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली आहे.
सध्या वाहतुकीचे नियम मोडल्यास बहुतेक वेळा फक्त दंड आकारला जातो. पण, एकच व्यक्ती वारंवार नियम मोडत असेल, तर ती फक्त दंड भरून पुन्हा तीच चूक करण्याची शक्यता असते. हेच थांबवण्यासाठी सरकार आता नियम मोडण्यावर लक्ष ठेवून त्यानुसार निगेटिव्ह पॉइंट्स देणारी एक नवीन पद्धत आणण्याचा विचार करत आहे.
जेव्हा एखादी व्यक्ती वाहतुकीचा नियम मोडेल, तेव्हा प्रत्येक वेळी तिच्या ड्रायव्हिंग लायसन्सच्या रेकॉर्डमध्ये काही ठराविक निगेटिव्ह पॉइंट्स जोडले जातील.
उदाहरणार्थ, जर एखादा ड्रायव्हर सतत वेगाने गाडी चालवत असेल, सिग्नल तोडत असेल किंवा धोकादायकपणे गाडी चालवत असेल, तर त्याच्या रेकॉर्डमध्ये निगेटिव्ह पॉइंट्स वाढत जातील.
हे निगेटिव्ह पॉइंट्स एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त झाले, तर संबंधित व्यक्तीचं ड्रायव्हिंग लायसन्स काही काळासाठी सस्पेंड करणं किंवा रद्द करण्यासारखी कारवाई केली जाऊ शकते.
या योजनेतील हा सर्वात महत्त्वाचा आणि लक्ष वेधून घेणारा मुद्दा आहे. जर एकाच गाडीचा वापर सतत वाहतुकीचे नियम मोडण्यासाठी होत असेल, तर त्या गाडीच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटवर (RC) सुद्धा कारवाई करण्याचा विचार केला जात आहे.
म्हणजेच, जर नियम मोडणं असंच सुरू राहिलं, तर भविष्यात गाडीचं रजिस्ट्रेशनसुद्धा काही काळासाठी सस्पेंड किंवा रद्द करण्याची कडक कारवाई होऊ शकते.
या नवीन निगेटिव्ह पॉइंट्स सिस्टीमचे अंतिम नियम अजून पूर्णपणे जाहीर झालेले नाहीत. पण, काही महत्त्वाचे वाहतूक नियम यात नक्कीच विचारात घेतले जातील. त्यामध्येः
• ट्रॅफिक सिग्नल तोडणे
• ठरवून दिलेल्या वेगापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवणे
• ↔ चुकीच्या लेनमधून किंवा विरुद्ध दिशेने गाडी चालवणे
• गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणे
• दारू पिऊन गाडी चालवणे
• हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे
• सीट बेल्ट न लावता कार चालवणे
• धोकादायक पद्धतीने गाडी चालवणे
यांसारख्या नियमांचा समावेश असण्याची शक्यता आहे. पण, कोणत्या नियमासाठी किती निगेटिव्ह पॉइंट्स दिले जातील, हे अजून ठरलेलं नाही.
याबद्दल सोशल मीडियावर बरीच माहिती फिरत आहे. काही जण म्हणत आहेत की ठराविक पॉइंट्स जमा झाल्यावर लायसन्स लगेच रद्द होईल. पण, केंद्र सरकारच्या या नवीन प्रस्तावात असा कोणताही ठराविक आकडा अजून अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. त्यामुळे, सध्या व्हायरल होणाऱ्या विशिष्ट पॉइंटच्या आकड्यांना अंतिम नियम समजू नका.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.